गुरुवार, १९ जानेवारी, २०१२

असे संपले २०११!!!


नूतन वर्षानिम्मिता हार्दिक अभिनंदन!! ... असे मेल्स  आणि मेसेजेस यायला सुरुवात झाली की एकदम वर्ष संपल्याची जाणीव होते.. मग  सगळ्यांच्या एकंच प्रतिक्रिया ..
 "कसं गेले वर्ष कळालच नाही ...किती लवकर गेले हे वर्ष..!!" खरच कस गेलं २०११ कळलच नाही..
पहिली ३-४ महिने खूपच धावपळीची गेली.. ऑफिस मधील बरीच सिनियर मंडळी सोडून गेल्याने कामाच लोड आणि जिम्मेदारी बरीच वाढला होत..त्यामुळे इतर गोष्टींकडे लक्ष्य द्यायला फारसा वेळ मिळत नव्हता.. आपण सगळेच आपला ध्येयामागे  इतके गुंग असतो क्की दिवस मोजणं लक्षात राहातच नाही.

या वर्षात बरेच भले बुरे अनुभव आले..काही गोष्टी न मागताही सहज मिळाल्या..काही चांगल्या गोष्टी अपेक्षा नसतानाही सहज मिळाल्या..तर काही गोष्टी ज्यांच्यासाठी खूप जीवापाड मेहनत केली होती त्या प्रयत्न करूनही नाही मिळाल्या....खूप नवीन मित्र -मैत्रिणी मिळाले...अनेक नवीन नाते जुडले..काही जुनी नाती पुन्हा नव्या रूपाने समोर आली...काही नाती कायमची तुटलीही...तसेच "चाहे जो तुम पुरे दिल से ..मिलता है वो मुश्कील से.या वाक्याचा परत एकदा खूप जवळून अनुभव आला...


असो,अशाच सगळ्या कडू गोड आठवणी घेऊन पुढच्या वर्षाच्या योजना करणे हेच तर आयुष्य..आणि यातच तर खरी मजा आहे..एखाद्याला हवं ते सगळच सहज मिळत गेलं तर आयुष्य किती बोर होऊन जाईल..मला तर असा वाटत आपण मागच्या वर्षीचे जितके क्षण, दिवस वर्षाच्या शेवटी आठवू शकतो ..मग ते चांगले असो किंवा वाईट..तेव्हडेच क्षण किंवा दिवस आपण खरया अर्थाने जगलेलो असतो..
म्हणून वाटतय या वर्षी प्रत्येक दिवस स्मरणात राहील असा करण्याचा प्रयत्न..कारण...झीन्दागी ना मिलेगी दोबारा!!!

सरत्या वर्षाच्या काही आठवणी..

Team award!!

Client Visit!!

Alibagg--ketakichya ghari!!

Dil chahata hai!!

Best Bday surprise--ever had!!

beach-birthday!!

Chaar chaughi!!

matheraan..!! Team building Trip!!

Performance Award!!

  

शुक्रवार, ६ जानेवारी, २०१२

सहज सुचलं म्हणून..





लिखाणाची आणि वाचनाची आवड तशी लहानपणापासूनच.या आधीही या लिंक  वरचे बरेच ब्लोग्स वाचले.कित्येकदा वाचून खळखळून हसले , तर कधी सहज डोळ्यातून पाणी आले.किती वेळा ब्लोग वाचून विचार करण्यास भाग पडले तर कधी ब्लोग्स वाचून माझे विचार बदलले.वाटलं आपणही लिहावं...पण कंटाळा आणि सुट्टी मिळाली कि लिहू , हे झाल कि लिहू, कामच लोड कमी झाल कि लिहू.. या सगळ्या पुढे मनातले विचार मनातच राहिले.
काल एक मैल वाचला..सलील कुलकर्णी यांचे विचार होते त्यात ..."राहूनच गेले.." हि तैग वाचून हातातले काम सोडून मैल वाचण्यास घेतला. ..विचार ताशे नेहमीचेच होते..वेळ मिळाला कि करू, अमुक चांगली गोष्ट झाली कि करू, या सगळ्या गोष्टींमध्ये करायच्या गोष्टी तशाच राहून जातात..आणि ती वेळ गेल्यावर त्या गोष्टी करण्यातला आनंदही तसाच हरवून जातो..

विचार करता करता आठवला लहानपनि शाळेत असताना आई भाषणाच्या स्पर्धेत छान
भाषण लिहून द्यायची..आणि मी जाऊन मनात येतील ते विचार बोलून द्यायचे... मराठीच्या पेपर
 मध्ये निबंध छान लिहिण्याच्या नादात पेपर अर्धवट राहिला म्हणून बाईंचा खालेला ओरडा...किती सहज होता तेव्हा सगळा...काहीही न ठरवता..
मग ठरवला काहीही झाला तरी मनातले विचार आपणही लिहून बघावेत... खूप काही अवघड आणि वैचारिक नाही लिहू शकले तरी अगदी सहज जे वाटेल ते लिहिण्याचा प्रयत्न करीन..
या नवीन वस्र्शाचा माझा हा संकल्प समजा..बघू.. दरवर्षीच्या संकल्प[प्रमाणे हा केवळ संकल्प राहणार नाही असा प्रयत्न करीन..


सर्वाना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्चा!!!!!!

पुढचा लेख: असे संपले २०११... कृपया वाचत राहा...!